रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा; ३६ गंभीर आजारांच्या औषधांवर करमुक्ती

संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा सरकारने केली असून, त्यामुळे या आजारांवरील उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ३६ जीवनरक्षक औषधांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी सहा महत्त्वाच्या औषधांवर केवळ ५ टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात येणार आहे. महागड्या औषधांमुळे वाढत चाललेला वैद्यकीय खर्च लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्करोग हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. त्याचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात, त्यात केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. फुफ्फुसांचा, स्तनाचा, अंडाशयाचा आणि रक्ताच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील मूलभूत शुल्क हटवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग