रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा; ३६ गंभीर आजारांच्या औषधांवर करमुक्ती

संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा सरकारने केली असून, त्यामुळे या आजारांवरील उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ३६ जीवनरक्षक औषधांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी सहा महत्त्वाच्या औषधांवर केवळ ५ टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात येणार आहे. महागड्या औषधांमुळे वाढत चाललेला वैद्यकीय खर्च लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्करोग हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. त्याचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात, त्यात केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. फुफ्फुसांचा, स्तनाचा, अंडाशयाचा आणि रक्ताच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील मूलभूत शुल्क हटवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Girish Mahajan : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा - महाजन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा

Eknath Shinde : पंढरपूर कॉरिडॉरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; "शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही"

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी

Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता, वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीने भीषण रूप धारण केले असून,

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी सरकारची जय्यत तयारी! पंढरपूरच्या विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्सपासून CCTV पर्यंत सर्व सुविधा सज्ज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य

Narendra Modi : सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; पंतप्रधान मोदी माध्यमांशी साधणार संवाद

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २० जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान