बुलढाण्यात बिबट्याची दहशत.. घराबाहेर आला अन् थेट व्हायरल व्हिडीओने खळबळ

बुलढाणा : गेले काही महिने बिबट्याने महाराष्ट्रभर उच्छाद मांडला आहे. शांततेच्या ठिकाणी दिसणार बिबट्या आता सर्रास वर्दळीच्या ठिकाणीही दिसून येत आहे. बिबट्या आपल्याला अंगणात, शेतात, गोठ्यात दर्शन देतोय एकूणच बिबटयाचा वावर काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.



बुलढाण्यात वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर


बुलढाण्यामधील मिर्झा नगर येथील रहिवासी आणि एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांच्या घरासमोर शनिवारी रात्री ९.३० सुमारास हा थरार घडला आहे. गुलाल हुसेन यांचा मुलगा घराबाहेर असताना त्याला घराच्या अगदी समोर बिबट्या उभा असलेला दिसला. रात्रीची वेळ असूनही परिसरात काही प्रमाणात वर्दळ असताना बिबट्या इतक्या धीटपणे मानवी वस्तीत शिरल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मिर्झानगरमध्ये कायम बिबट्याचा वावर हा आढळून आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात बिबट्याची भीती ही कायम आहे. या भागात असलेल्या झाडाझुडपांमुळे बिबट्यानं राहण्यास जागा उपलब्ध आहे त्यामुळे ते जवळच असलेल्या मानवी वस्तीत सहज शिरकावं करत आहेत. वनविभागाने गस्त घालण्याचे आश्वासन दिले असतांनाही ठोस पाऊले उचलली गेली नसल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे.


 


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


मिर्झा नगर हा भाग दाटीवाटीचा आहे. रात्री पर्यंत लोकांची रस्त्यावर वर्दळ ही चालू असते. इतक्या दाटीवाटीच्या ठिकाणीही बिबट्या सहज येऊ शकल्याने दुर्घटना नाकारता येत नाही,त्यामुळे बिबट्याचा कायमस्वपरुपी बंदोबस्त करावा शी मागणी नागरिक करत आहेत.

Comments
Add Comment

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक वाहतुकीला

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

Cabinet Decision : शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी

आचारसंहितेनंतर निकषांची घोषणा, ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार मुंबई : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत

जेजुरीत भाविकांना दिलासा! भंडारा खरेदीसाठी सक्ती करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

जेजुरीच्या खंडोबा (Khandoba) मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जेजुरी

Justice Suryakant : सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती

भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयातील पाच नव्या न्यायाधीशांना

कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडाली आहे.