किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा कारवाईदरम्यान दशतवाद्यांना कोणताही गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या क्षेत्रातील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.


सुरक्षा दलाने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सिंहपोरा, चिंगम व चतर या भागातील सहा किमी क्षेत्रात मोबाइल व इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने १८ जानेवारी रोजी या क्षेत्रात मोहीम सुरू केली होती. त्यावेळी मंड्राल-सिंहपोराजवळील सोनार जंगलात दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर ७ जवान जखमी झाले होते. त्यानंतर २२ जानेवारीला माली डाना टॉप व २५ जानेवारी रोजी जनसीर-कांडीवार भागात पुन्हा दहशतवाद्यांशी चकमकी उडाल्या त्यावेळी दहशतवादी जंगलात पसार झाले होते.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.