Budget 2026: दोन गंभीर आजारांवरील औषधे होणार स्वस्त; अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बजेटमधून दोन गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


औषधांवरील आयात शुल्कमध्ये कपात:


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना मधुमेह (डायबिटीज) आणि कर्करोग (कॅन्सर) उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या औषधांवरील कर सवलती जाहीर केल्या. या निर्णयामुळे देशभरातील लाखो रुग्णांना उपचार खर्चात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने औषधांवरील आयात शुल्क, उत्पादन शुल्क तसेच काही कर घटकांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


या निर्णयाचा थेट फायदा मधुमेह व कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना तसेच उपचार करणाऱ्या रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांना होणार आहे. दीर्घकालीन उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मासिक औषध खर्च देखील आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.


या अर्थसंकल्पात कॅन्सर थेरपीसाठी लागणारी काही अत्यावश्यक औषधे, इन्सुलिन व इतर मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी औषधे, तसेच निदानासाठी लागणाऱ्या काही वैद्यकीय घटकांवरील शुल्क सवलतींचा समावेश आहे. परिणामी, बाजारातील एमआरपीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


अर्थसंकल्प २०२६ मंजूर झाल्यानंतर संबंधित अधिसूचना प्रसिद्ध होताच हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील. पुढील काही आठवड्यांत औषध कंपन्या व वितरकांकडून नव्या किमती लागू होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात... उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात 'खडूस सासू' म्हणून घराघरांत

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Multiple UPI Apps : एकाच मोबाईल नंबरवर चालणार २ किंवा त्याहून अधिक UPI! जाणून घ्या सोपी पद्धत आणि महत्त्वाचे नियम

मुंबई : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय (UPI) चा वापर करत आहे. मात्र, अनेकदा

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त