ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया मीरा-भाईंदर महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे हा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परिणामी, निधीच्या प्रतीक्षेत भूसंपादनाची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ठाणे-घोडबंदर रोडवर नियमित वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असून त्यावर अनेक वळणे व चढ-उतार आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. या कोंडीतून कायमची सुटका करण्याच्या दृष्टीने ठाणे-घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंतचा सुमारे सहा किमीचा रस्ता ६० मीटर रुंद केला जाणार आहे. या रस्त्याचे काम एमएमआरडीए करणार असून भूसंपादनाची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेकडे देण्यात आली आहे.


महापालिका प्रशासनाने रस्त्याचे सर्वेक्षण करत ६० मीटर रुंद रस्त्याचे रेखांकन तयार केले आहे. यासह विकास आराखड्यात ६० मीटर रस्ता दर्शवण्यात आला आहे. बाधित जमीनमालकांना भूसंपादनाच्या अानुषंगाने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ती ताब्यात घेण्यासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सद्यस्थितीत महापालिकेला निधीअभावी दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे साहजिकच भूसंपादन करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे हा खर्च निधी स्वरूपात राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. अन्यथा रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या खर्चात भूसंपादनाचा खर्चही समाविष्ट करून तो एमएमआरडीएने महापालिकेला देण्याची विनंती करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतरच भूसंपादन करता येणार आहे. ठाणे-घोडबंदर रोड हा संजय गांधी उद्यानाला लागून जातो. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण हे वन विभागाची परवानगी न घेता बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात जोवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोवर परवानगी न देण्याची भूमिका वन विभागाने घेतली असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना