संत कबीर

हीरा वहाँ न खोलिये
हीरा वहाँ न खोलिये, जहाँ खोटी है हाट।
कस करि बाँधो गाँठरी,
ऊठ कर चालो बाट।।


- डॉ. देवीदास पोटे


आंधळ्याच्या राज्यात पैठणी विकायला जाऊ नये असे एक वचन आहे. संत कबीर यांनी हेच व्यावहारिक तत्व आपल्या रचनेद्वारा प्रतिपादन केले आहे. या रचनेत संत कबीर म्हणतात, " जिथे प्रामाणिकपणा वा पारख नसेल वा बाजार लबाडीने भरलेला असेल तिथे आपल्याजवळचा हिरा विकायला काढू नये, अशा वेळी तो हिरा आपल्या कनवटीला कनकचून बांधून पुढची वाटचाल करणे हेच श्रेयस्कर असते."


जिथे गुणांची पारख नसेल तिथे आपले शहाणपणाचे बोल व्यर्थ ठरतात. हिरा अस्सल आहे हे ओळखण्यासाठी रत्नपारखी हवा असतो. हे येरागबाळ्याचे काम नाही. गुणांची पारख करणारा जसा ज्ञानी हवा तसाच तो प्रामाणिकही हवा. जिथे लबाडी वा खोटेपणा असेल तिथे अस्सल हिरा वा गुणवान माणसांचा निभाव लागणार नाही. संत कवीर हे स्पष्टवक्ते आणि व्यवहारातले सत्य जाणणारे होते. मनुष्यस्वभावाची त्यांना जाण होती. म्हणूनच असंगाचा संग करू नये हे तत्व त्यांनी अत्यंत समर्पक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे. गुणांची कदर सज्जनांच्या गावातच होते. संत सज्जनांच्या ठायी सत्य, प्रेम, नीती, करूणा, मानवता यांचे अधिष्ठान असते. हे विश्वचि माझे घर' अशी त्यांची विशाल जीवन दृष्टी असते. जगातील अवघे लोक आपले बंधू, आप्त आहेत अशी त्यांची सर्वात्मक विचारसरणी असते. याउलट लबाडांच्या राज्यात सारेच खोटे, वरवरचे आणि दिखाऊ असते. सद्गुणांना तिथे काहीच किंमत नसते. दुष्टपणा, अनीती, बनवाबनवी, फसवणूक अशा नकारात्मक गोष्टींनी लबाडीचा गाव परिपू्र्ण असतो. यामुळेच सूज्ञ, विवेकी माणसाने आजूबाजूच्या परिस्थितीचे, स्थळकाळाचे भान ठेवावे असे कबीरांनी सुचविले आहे, संत आपल्या आयुष्यात दिशादर्शक दीपस्तंभाचे काम करतात, ते असे. लोकांना आयुष्यातील चांगला गोष्टींबाबत मार्गदर्शन करणे हे संतांचे ब्रीद असते. धर्म रक्षा वयासाठी । करणें आटी आम्हासी ।।' असे संत तुकाराम म्हणतात, ते याच भूमिकेतून. जनलोकांच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणे हेच संतांच्या आयुष्याचे प्रयोजन असते. संतांचे संतपण ते हेच.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन