रायगड जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान

४१ अंधांना मिळाली नवी दृष्टी


अलिबाग : मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षाच्या कालावधीत ४१ दृष्टिहिनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.


माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासात काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो आणि हे जग त्यांना पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला ६० टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरिरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या 'कॉनिर्या' या भागाचे रोपण केले जाते.


रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे ३०० नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. १ एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात १४७ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून ४१ अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली, तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.


असे झाले नेत्रदान


१ एप्रिल २१ ते ३१ डिसेंबर २५ या कालावधीत रायगड जिल्ह्यात १४७ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. (२९४ नेत्र बुबुळांचे संकलन) जिल्हा रुग्णालयात ८८ नेत्र बुबुळे संकलन (४४ जणांचे नेत्रदान), शंकर आय बँक १६ नेत्र बुबुळे संकलन (८ नेत्रदान), लक्ष्मी आय बँक १९० नेत्र बुबुळे संकलन (८० जणांचे नेत्रदान), शस्त्रक्रिया ४१, संशोधन ११६, इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ ६.

Comments
Add Comment

रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....

मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता

मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा

प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधा मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी

Budget 2026 : रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट! कंटाळवाणा प्रवास विसरा, वंदे भारत सुसाट धावणार; पाहा काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी

Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने

अजित पवारांविषयी संजय राऊतांचे प्रेम पुतनामावशीसारखे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लगेच उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची इतकी घाई का केली असं