विमानतळ प्रकल्पात मच्छीमारांचे हित जपणार

खासदार सवरा यांनी लोकसभेत लावून धरला प्रश्न


पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित असलेल्या विमानतळ प्रकल्पाचा वेग वाढवतानाच स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर गदा येणार नाही, याची काळजी घेण्याची आग्रही भूमिका पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी गुरुवारी लोकसभेत मांडली. त्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी, मच्छीमार आणि पर्यावरणाचा सर्वंकष अभ्यास केल्याशिवाय प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासन सभागृहात दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी विकास आणि स्थानिक रोजगार यांचा समतोल राखण्यावर भर दिला.


पालघर विमानतळाच्या उभारणीसाठी 'साइट क्लिअरन्स' मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आणून देत, केंद्र सरकारने राज्य सरकारशी समन्वय साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी खा. सवरा यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराच्या जवळ समुद्रात विमानतळ उभारण्याची संकल्पना मांडली होती, याकडे डॉ. सवरा यांनी लक्ष वेधले. जर विमानतळ समुद्रात होणार असेल, तर तेथील नैसर्गिक मासेमारी, मच्छिमार बांधव आणि मासेमारी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने मच्छिमारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत रास्त असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी त्यांची प्रशंसा केली. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, विमानतळ जमिनीवर असो वा समुद्रात, त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी बंधनकारक असते. खासदार यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि मच्छिमारांच्या हितासाठी सखोल सर्वेक्षण केले जाईल. त्यामध्ये काही आक्षेप आढळल्यास त्यावर योग्य कार्यवाही केल्याशिवाय क्लिअरन्स दिला जाणार नाही. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांचे आभार मानले.

Comments
Add Comment

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन

चेक बऊन्सप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर राजपालचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : तिहारमधून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादव तातडीने उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे त्याच्या

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

‘दो दीवाने सहर में’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; मृणाल ठाकुर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अनोख्या प्रेमकथेचा मोठ्या पडद्यावर अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा

मुंबई : Zee Studios आणि Bhansali Productions यांच्या आगामी रोमँटिक ड्रामा ‘दो दीवाने सहर में’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये

“लल्ला… तैयार रहना!”: Amazon Prime Video कडून ‘सुबेदार’मधील दमदार नव्या गाण्याचे अनावरण

मुंबई : ‘लल्ला अँथम : अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी आज

Chhatrapati Sambhajinagar: पत्नी माहेरी न दिसल्याने पतीने थेट सासरवाडी गाठली अन्...

छत्रपती संभाजीनगर: पत्नी माहेरी न दिसल्याने पती संतापला आणि थेट मध्यरात्री सासरवाडी गाठली. कौटुंबिक वादाच्या