विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटने दिलेला 'तो' शेवटचा संदेश आणि प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाल्याची बातमी समजताच पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय नेते, इतर महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी कालपासूनच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण शहर सध्या भावनांने डबडबलेले आहे.


पायलटचा शेवटचा संवाद आणि तांत्रिक बिघाड


मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही सेकंद आधी वैमानिकाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, पायलटने विमानाच्या इंजिनमधील बिघाड किंवा तांत्रिक अडचणीबाबत शेवटचा संकेत दिला होता. "आम्ही नियंत्रण गमावत आहोत," अशा आशयाचा संदेश देऊन काही क्षणातच संपर्क तुटला आणि विमानाचा अपघात झाला.


एटीसी (ATC) अहवालातून विमान अपघाताचा थरार उघड


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या (ATC) हवाल्याने आता अत्यंत महत्त्वाची आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे. २८ जानेवारीच्या सकाळी नेमकं काय घडलं, याचा मिनिटा-मिनिटाचा तपशील प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाला आहे. विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क झाला. त्यावेळी हवामान स्थिर होते आणि दृश्यमानता (Visibility) साधारण ३००० मीटर इतकी होती. पायलटने रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले, मात्र सुरुवातीला त्यांना धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. "रनवे दिसला की पुन्हा कळवतो," असा संदेश वैमानिकाने एटीसीला दिला होता. एटीसीने रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज केला होता. मात्र, याच वेळी पायलटकडून मिळणारा प्रतिसाद अचानक बंद झाला.


एटीसीवरील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, विमानाशी संपर्क तुटल्यानंतर काही सेकंदातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला भीषण ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उठताना दिसले. रनवे दिसण्याच्या प्रयत्नात असतानाच विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या