कुंभमेळ्याच्या रिंग रोडला असलेला अडथळा अखेर संपला

उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यश


नाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून पडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले असून या प्रकरणात पहिली खरेदी झाली आहे आणि महिला शेतकरी कोट्याधिश झाली .


कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन ६६.१५ किलोमीटर लांबीच्या नाशिक वर्तुळाकार मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. चार ते सहा पदरी हा मार्ग शहरालगतच्या २५ गावांतून जाणार आहे. डीआरडीओ जंक्शन (राष्ट्रीय महामार्ग ६०) पासून सुरू होऊन शहराला वळसा घालत पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाईल. चार राष्ट्रीय महामार्ग व चार राज्य महामार्गांना जोडणारा हा मार्ग शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यात तसेच सिंहस्थ काळात अखंड वाहतूक सुलभ करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ३६५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून त्यात काही शासकीय जमिनीचाही समावेश आहे. भूसंपादनात नोटीससाठी १५० दिवसां कालावधी असतो. थेट खरेदीच्या माध्यमातून अवघ्या ६७ दिवसांत या जागेची खरेदी दृष्टीपथास आली.


प्रशासनाने रेडी रेकनरच्या चार पट आणि २५ टक्के अधिक मोबदला देऊन थेट खरेदीची तयारी दर्शविली. तीन वर्षांत त्या भागात जागांना मिळालेल्या दरांचे (खरेदीखत) अवलोकन करून अधिकाधिक मोबदल्याचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. थेट खरेदीत सहभागी होण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या थेट खरेदीला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. इंदुबाई गायकवाड यांची दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथील ३३ गुंठे जागा शासनाने या माध्यमातून खरेदी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गायकवाड यांना मोबदल्यापोटी तीन कोटी १९ लाख ६५ हजार ४२० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंग भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. थेट खरेदीला प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नाशिक वर्तुळाकार मार्गासाठी ७० वर्षीय इंदुबाई गायकवाड या जमीन देणाऱ्या पहिल्या शेतकरी ठरल्या. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.



उपजिल्हाधिकारी वाघांनी केलेली मध्यस्थी यशस्वी


अवघ्या 67 दिवसांमध्ये नोटीस दिल्यानंतर ही खरेदी झाली आहे या भागातील शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये विरोध होता पण भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जी मेहनत घेतली शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले त्याची पूर्तता केली त्यांच्यावरती विश्वास ठेवून या भागातील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला असलेला विरोध हा कमी केला आणि त्यामुळे जो अडथळा होता तो दूर करण्यात मोठ्या प्रमाणावर ती उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जी निर्माण झालेली कोंडी होती ती मात्र फुटली.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे