बेपत्ताचा शोध लावण्यात तलासरी पोलीस अग्रेसर

तलासरी :महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी तालुक्यातील रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधण्यात तलासरी पोलिसांना मोठे यश आले आहे. २०२५ मध्ये दाखल झालेल्या ३६ मिसिंग केसेसपैकी ३४ जणांचा शोध लावून पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे. तलासरी तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी आणि अल्पवयीन मुली शेजारच्या गुजरात राज्यात कामासाठी जातात. कामाच्या ठिकाणी अनेकदा तरुण-तरुणी प्रेमात पडून घरच्यांना न सांगता निघून जातात. अशा परिस्थितीत हतबल झालेले कुटुंबीय पोलीस स्टेशनमध्ये 'मिसिंग'ची तक्रार दाखल करतात.


या शोध मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. घर सोडून गेलेल्या व्यक्तींचा तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी अनेकांचे संसार आणि कुटुंब पुन्हा सावरले आहेत. तलासरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्वरित पोलिसांशी
संपर्क साधावा.


३६ पैकी ३४ बेपत्ता व्यक्तींचा यशस्वी शोध


२०२५ मध्ये एकूण ३६ बेपत्ता तक्रारींची नोंद झाली होती.
त्याचा सविस्तर तपशील :
एकूण तक्रारी : ३६
यशस्वी शोध : ३४
महिला : २४ (तक्रारींपैकी बहुतांश
शोधण्यात यश)
पुरुष : १२
अपहृत मुले व मुली : ४ मुले आणि २ मुली (एकूण ६ जणांचा शोध घेऊन
घरवापसी केली).
प्रलंबित तपास : केवळ १ पुरुष आणि १ महिला यांचा शोध घेणे बाकी आहे.

Comments
Add Comment

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना