Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली असून, या दुर्घटनेच्या कारणांची सखोल व पारदर्शी चौकशी केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


बुधवारी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते थेट जमिनीवर आदळले. या दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, गुरुवारी बारामतीत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक गावांमध्ये बंद पाळून नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.



या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टळाव्यात, यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना पत्र पाठवले होते. अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यासह इतर चार जणांचा मृत्यू हा अत्यंत गंभीर प्रकार असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले होते.


दरम्यान, या पत्राला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) कडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, नियमांनुसार सर्वंकष तपास केला जात आहे. तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल तपशील आणि घटनास्थळावरील सर्व तथ्यांची पडताळणी करण्यात येत असून, ही चौकशी पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत, या दृष्टीने राज्य सरकारच्या सूचनेची मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असून, स्थानिक प्रशासनाची मदतही अपेक्षित असल्याचे नायडू यांनी नमूद केले. संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे