Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचेही त्यांनी सांगितले.


आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत : 


संसद भवन संकुलातील खरगे यांच्या दालनात झालेली ही बैठक तब्बल १ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली. या भेटीविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की; " राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे  यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली, रचनात्मक, आणि सकारात्मक झाली, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की; आमच्यात सर्व काही अलबेल आहे आणि आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत. मी आणखी काय सांगू."







यावेळी पत्रकारांनी केरळ निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली का, असे विचारले असता थरूर म्हणाले, "तो मुद्दा कधीच नव्हता. मला कोणत्याही गोष्टीचा उमेदवार होण्यात रस नाही. सध्या मी खासदार आहे, तिरुवनंतपुरममधील माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. संसदेत त्यांचे हित जपण्याचे काम मला करावे लागेल, तेच माझे काम आहे."







केरळमधील पक्ष नेत्यांनी थरूर यांना बाजूला केल्याच्या कथित घटनेमुळे थरूर नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.  तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि राजनैतिक संपर्काबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवरून आणि यापूर्वी झालेल्या मतभेदांमुळेही तणाव निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य