Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचेही त्यांनी सांगितले.


आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत : 


संसद भवन संकुलातील खरगे यांच्या दालनात झालेली ही बैठक तब्बल १ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली. या भेटीविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की; " राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे  यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली, रचनात्मक, आणि सकारात्मक झाली, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की; आमच्यात सर्व काही अलबेल आहे आणि आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत. मी आणखी काय सांगू."







यावेळी पत्रकारांनी केरळ निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली का, असे विचारले असता थरूर म्हणाले, "तो मुद्दा कधीच नव्हता. मला कोणत्याही गोष्टीचा उमेदवार होण्यात रस नाही. सध्या मी खासदार आहे, तिरुवनंतपुरममधील माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. संसदेत त्यांचे हित जपण्याचे काम मला करावे लागेल, तेच माझे काम आहे."







केरळमधील पक्ष नेत्यांनी थरूर यांना बाजूला केल्याच्या कथित घटनेमुळे थरूर नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.  तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि राजनैतिक संपर्काबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवरून आणि यापूर्वी झालेल्या मतभेदांमुळेही तणाव निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ