Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचेही त्यांनी सांगितले.


आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत : 


संसद भवन संकुलातील खरगे यांच्या दालनात झालेली ही बैठक तब्बल १ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली. या भेटीविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की; " राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे  यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली, रचनात्मक, आणि सकारात्मक झाली, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की; आमच्यात सर्व काही अलबेल आहे आणि आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत. मी आणखी काय सांगू."







यावेळी पत्रकारांनी केरळ निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली का, असे विचारले असता थरूर म्हणाले, "तो मुद्दा कधीच नव्हता. मला कोणत्याही गोष्टीचा उमेदवार होण्यात रस नाही. सध्या मी खासदार आहे, तिरुवनंतपुरममधील माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. संसदेत त्यांचे हित जपण्याचे काम मला करावे लागेल, तेच माझे काम आहे."







केरळमधील पक्ष नेत्यांनी थरूर यांना बाजूला केल्याच्या कथित घटनेमुळे थरूर नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.  तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि राजनैतिक संपर्काबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवरून आणि यापूर्वी झालेल्या मतभेदांमुळेही तणाव निर्माण झाला होता.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने