Ajit Pawar Passes Away : सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रु अनावर

बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.


विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुणे सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते त्यांना पाहून सुळे आणि सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. विठ्ठल शेठ मणियार यांना सुप्रिया सुळे म्हणाल्या 'तुमचा लाडला होता' असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबांना पाहून यावेळी उपस्थितीत लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं.


उपस्थितांचे आभार मानताना जय पवारांना अश्रू अनावर


अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. विद्या प्रतिष्ठानमधील अंत्यदर्शन आटोपल्यानंतर दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी दिली. यावेळी जमलेल्या जनसागराशी संवाद साधताना जय पवार यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. जय पवार यावेळी अत्यंत भावूक झाले होते. उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी दादांवर जे अफाट प्रेम केले, ते आज या गर्दीच्या रूपाने मला दिसत आहे. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. दादा आज आपल्यात नसले, तरी ते आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये कायम जिवंत राहतील." "दादांनी आजपर्यंत आपल्या सर्वांसाठी ज्या जिद्दीने लढा दिला, तसाच लढा आपल्याला भविष्यातही द्यायचा आहे," असा निर्धार जय पवार यांनी व्यक्त केला. उद्या सकाळी ११ वाजता अंतिम संस्कारांसाठी पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करताना जय पवारांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावले होते.


"सहकार्य करा, संयम राखा"; पार्थ पवार


दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आली असता, पार्थ पवार यांनी जमलेल्या जनसागराला भावूक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. वाढती गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन पार्थ पवार म्हणाले, "आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. येथून बाहेर पडताना सर्वांनी शिस्त पाळावी. कोणालाही धक्का लागणार नाही, विशेषतः महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या." उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून पुढची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली. पार्थ पवारांनी माहिती दिली की, उद्या सकाळी १० वाजता पुन्हा सर्वजण याच ठिकाणी जमणार आहोत. "आम्ही सर्वजण इथे पुन्हा येणार आहोत, तोपर्यंत सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावे," असे आवाहन त्यांनी केले. शोकाकुल वातावरणातही पार्थ पवारांनी दाखवलेल्या या संयमी नेतृत्वामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा