महाराष्ट्राचा दादा हरपला, लोकनेते रामशेठ ठाकूर भावुक

पनवेल :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. त्यांच्या अकाली निधनाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, दर्शन ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, नगरसवेक राजू सोनी, सुमित झुंझारराव, गणेश भगत, रुपेश नागवेकर, उमेश भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पनवेल येथील हुतात्मा चौक येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


महाराष्ट्राचे महत्वाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघाताने निधन झाले आणि हे वृत्त कळताच मनाला खूप दुःख झाले. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आकस्मिक असं संकट महाराष्ट्रावर आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच दोन तास मी स्तब्धच होतो, काय बोलावे सुचतच नाही. जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम आपुलकी आणि तितक्याच तडफेने काम करणारे असे ते होते. त्यामुळे प्रत्येकाला वाटते कि आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती हरपला आहे. अजितदादा यांची माझी जास्त वेळ भेटी झाल्या नसल्या तरी जेवढ्या भेटी झाल्यात त्यामध्ये आम्ही एकमेकांच्या मनातील बोलत होतो त्यामुळे त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते होते. काही महिन्यापूर्वी ईश्वरपूर येथे एका कार्यक्रमात भेट झाली होती. व्यासपीठावर आमच्यामध्ये दोन चार मिनिटे चर्चा झाली. त्या कार्यक्रमात त्यांनी बोलताना १२ कोटी जनतेचा उल्लेख करत आणि मला कल्पना नसलेले माझ्या विषयी ते कौतुकाने जाहीरपणे भरभरून बोलले. सर्वसामान्यांची कदर आणि ओळख असलेला हा नेता. सामान्य माणसाची कदर ओळखणारे, खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ठामपणे सांगणारे असे नेतृत्व महाराष्ट्राने गमावल्याची आणि महाराष्ट्राचा दादा हरपल्याची भावुक प्रतिक्रिया लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे नेते अशी होती. विमान अपघातात त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायक पद्धतीचे वृत्त आहे. अजितदादांनी सदैव धडपडणाऱ्या, काम करणाऱ्या माणसाला आधार दिला आहे. विशेषत्वाने रायगड जिल्ह्यावर त्यांचे प्रेम होते. रायगड जिल्ह्यातील अनेक विकासकामांना त्यांनी पाठबळ दिले. ते पाहता संपूर्ण जिल्ह्यातला प्रत्येक राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आज हळहळत आहे. अजितदादांच्या निधनाचे आज हे वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना शोक अनावर झाला आहे. त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख झाला आहे आणि यातून त्यांना सावरणे कठीण आहे. अजितदादांनी केलेले कार्य अजोड आहे. रायगड जिल्हा भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या