भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ


करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ


नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन युनियन यांच्यात तब्बल १८ वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर ऐतिहासिक मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, भारत–युरोपीयन महासंघ परिषदेत याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. वस्तू, सेवा आणि गुंतवणूक या तिन्ही क्षेत्रांचा समावेश असलेला हा व्यापक करार दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना नवे बळ देणारा ठरणार आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले आहे.


या करारानुसार दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर टॅरिफ कपात केली जाणार असून, युरोपीयन युनियनकडून भारतात येणाऱ्या जवळपास ९० टक्के वस्तूंवर शुल्क शून्य किंवा अत्यल्प राहणार आहे. यामुळे युरोपीयन निर्यातदारांना दरवर्षी सुमारे ४ अब्ज युरो इतक्या शुल्काची बचत होईल, असा अंदाज आहे. तसेच २०३२ पर्यंत युरोपातून भारतात होणारी निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


वाहन क्षेत्रात मोठी सवलत देण्यात आली असून, सध्या कार आणि व्यावसायिक वाहनांवर आकारले जाणारे सुमारे ११० टक्के आयात शुल्क थेट १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. मात्र यासाठी दरवर्षी २.५ लाख वाहनांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मद्य आणि पेयांमध्ये बिअरवरील शुल्क ५० टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल, तर वाईनवरील टॅरिफमध्ये सुमारे ४० टक्के कपात होणार आहे. याशिवाय जैतून तेल, मार्जरीन आणि इतर वनस्पती तेलांवरील शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात येईल, तसेच फळांचे रस व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवरील करही हटवले जाणार आहेत.


औद्योगिक क्षेत्रालाही या कराराचा मोठा लाभ होणार आहे. यंत्रसामग्रीवरील ४४ टक्क्यांपर्यंतचे शुल्क कमी करण्यात येणार आहे. औषधे व वैद्यकीय उपकरणांवरील सुमारे ११ टक्क्यांपर्यंतचे शुल्क जवळपास संपुष्टात आणले आहे. एअरक्राफ्ट आणि स्पेसक्राफ्टवरील टॅरिफ पूर्णपणे रद्द करण्यात आल्याने उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. तसेच युरोपीयन युनियनमधील जवळपास सर्वच रासायनिक उत्पादनांवरील शुल्क समाप्त होणार असल्याने भारतीय उद्योगांना स्वस्त कच्चा माल उपलब्ध होईल.


या करारामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १७ टक्के निर्यात युरोपीयन युनियनला होते. वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, आयटी सेवा, ऑटो पार्ट्स, दागिने आणि कृषी-आधारित उत्पादनांसाठी युरोपियन बाजार अधिक खुला होणार असून, भारतीय निर्यातदारांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळेल. तसेच चीन आणि अमेरिकेवरील व्यापार अवलंबित्व कमी करण्यासही हा करार मदत करणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


हा करार जवळपास २० वर्षांपासून रखडलेला होता. अनेक संवेदनशील मुद्द्यांवर मतभेद होते, मात्र अलीकडील काळात बहुतेक तांत्रिक प्रकरणे निकाली निघाल्याने कराराच्या दिशेने वेगाने वाटचाल झाली आहे. युरोपीयन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपीयन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान उच्चस्तरीय चर्चा झाल्या असून, वातावरण सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. एकूणच, भारत–युरोपीयन युनियन मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही बाजूंच्या व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्याला नवे बळ मिळणार असून, जागतिक व्यापारातील बदलत्या समीकरणांमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.


भारत-युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करारात नेमके काय?




  • २०२४-२५ मध्ये १३६ अब्ज डॉलर्सचा वस्तुंचा द्विपक्षीय व्यापार.

  • २०२४-२५ मध्ये भारताची ७५ अब्ज डॉलर्सची निर्यात, ६१ अब्ज डॉलर्सची आयात.

  • २०२४- २५ मध्ये सेवा क्षेत्रात ८३ अब्ज डॉलर्सचा व्यापार.

  • भारताची १७ टक्के निर्यात युरोपियन महासंघाकडे होते.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण