Ajit Pawar Passed Away : कमी दृश्यमानतेमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच, या भीषण विमान अपघातामागील प्राथमिक कारण स्पष्ट झाले आहे. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी असलेली कमी दृश्यमानता (लो व्हिजिबिलिटी) हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मंत्री नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अजित पवार यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले असता परिसरात दाट धुके होते. या वेळी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर वैमानिकाने धावपट्टी दिसत नसल्याचे कळवले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमानाने हवेतच एक फेरा (गो-अराउंड) मारला.

यानंतर दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याची माहिती दिल्यानंतर एटीसीने लँडिंगची परवानगी दिली. मात्र, प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी दृश्यमानता केवळ सुमारे ८०० मीटर इतकी मर्यादित असल्याने वैमानिकाचा अंदाज चुकला असावा. परिणामी, विमान धावपट्टीच्या जवळील शेतात कोसळले आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) यांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून, संपूर्ण प्रकरणाची अत्यंत पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जाईल, असे आश्वासन मंत्री नायडू यांनी दिले आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री के. राममोहन नायडू यांनी बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर