Raigad Crime : रानात लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेसोबत विकृत माणसाचा विनयभंग ;रायगडमधील संतप्त घटना

रायगड : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.महिलांवरील अत्याचार थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका विधवा महिलेसोबत अत्याचाराची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेली ही विधवा महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील एका इसमाने तिचा विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडत “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेला जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

या घटनेनंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट