Raigad Crime : रानात लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेसोबत विकृत माणसाचा विनयभंग ;रायगडमधील संतप्त घटना

रायगड : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.महिलांवरील अत्याचार थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका विधवा महिलेसोबत अत्याचाराची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावालगत असलेल्या बेलवाडी शेजारील रानात ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. घरगुती वापरासाठी जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी गेलेली ही विधवा महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील एका इसमाने तिचा विनयभंग केला. ग्रामीण भागात महिलांना दैनंदिन कामासाठीही सुरक्षितता नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडित महिला रानात लाकडी फाटे गोळा करत असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने अचानक तिचा हात पकडत “तुझा नवरा मेला आहे, मग तुझं कसं काय?” असे अत्यंत नीच, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेला जवळ ओढून तिच्या स्त्रीसन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १७/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

या घटनेनंतर नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
Comments
Add Comment

काळा घोडा महोत्सवात महिला बचत गटांची चांदी; तब्बल ९ दिवसांमध्ये कमवले साडेआठ लाख रुपये

मुंबई: मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक

Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण

डोंबिवलीमध्ये रंगणार 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह'

मुंबई: शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे

थिएटर रिलीजपूर्वी ‘बैटल ऑफ गलवान’ टीमकडून खास आदरांजली; लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित व्हिडिओ मालिका प्रदर्शित

मुंबई : Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या

Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना