Pune Crime News : ५० तोळे सोने अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही 'तिचा' छळ, गर्भपात केला; इंजिनिअर दीप्ती चौधरीने घेतला गळफास!

पुणे : पुण्यातील सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. दीप्ती मगर-चौधरी असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचा पती, सरपंच सासू, शिक्षक सासरे आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि मुलगी नको म्हणून जबरदस्तीने केलेला गर्भपात यामुळे दीप्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती समोर आली आहे.


लग्नात ५० तोळे सोने, २५ लाखांची गाडी; तरीही पैशांची हाव कायम!


दीप्तीचा विवाह २०१९ मध्ये रोहन चौधरी याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात ५० तोळे सोने देऊनही सासरच्यांची पैशांची हाव संपली नाही. माहेरून १० लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडीसाठी २५ लाख रुपये देऊनही तिचा छळ सुरूच होता. "तू दिसायला सुंदर नाहीस, तुला घरातील कामे येत नाहीत," असे टोमणे मारून दीप्तीचे सतत मानसिक खच्चीकरण केले जात होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण केली जात होती, अशी तक्रार दीप्तीच्या आईने दिली आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीला झालेली गर्भपाताची सक्ती. दीप्तीला पहिली मुलगी होती. दुसऱ्यांदा ती गरोदर असताना, 'वंशाला दिवा हवा' या हट्टातून सासरच्यांनी तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी केली. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, तिची इच्छा नसतानाही तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. या अमानुष प्रकारामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. विशेष म्हणजे, दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडीच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक पेशात आहेत. समाजात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनीच अशा प्रकारे हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्येसारखे गुन्हे केल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर