स्थायी समितीवर कुणाची लागणार वर्णी?

कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांच्या नावाचा होऊ शकतो विचार


मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन करून महापौरांसह स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. मात्र, मुंबईचा महापौरपदापेक्षा मोठी समिती म्हणून ओळखली जाते ती स्थायी समिती. या समितीवर सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी अनेक विविध पक्षांच्या नगरसेवकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे महापालिकेतील या सर्वोच्च अशा स्थायी समितीवर कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागली जाईल याचा अंदाज यामाध्यमातून घेण्यात आला आहे.


स्थायी समिती ही वैधानिक समिती असून या समितीमध्ये आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. प्रकल्प कामांसह कंत्राट कामांना या समिती त मंजुरी दिली जाते. या समितीत २६ सदस्य असतात. यात शिक्षण समिती अध्यक्ष हे पदसिध्द सदस्य असतात. सध्या भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, एमआयएम आणि मनसेचे नगरसेवक संख्याबळ गृहीत धरता या समितीत त्यांची गणसंख्या अनुक्रमे १०,०३,०८,०३,०१ आणि ०१ एवढी आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ १३ आहे. तर उबाठा आणि मनसेचे संख्या बळ ०९ एवढे आहे. तर उबाठा, मनसे, काँग्रेस आणि एमआयएम हे पक्ष एकत्र आल्यास त्यांचे संख्या बळ १३ एवढे होणार आहे. परंतु शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने भाजपची गणसंख्या ११ होणार आहे आणि शिवसेनेची तीन गृहीत धरल्यास त्यांचे संख्याबळ १४ होणार आहे. यातच एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास महायुतीचे पारडे जड होणार आहे.


कोणत्या पक्षाच्या कोणत्या संभाव्य सदस्यांची लागू शकते वर्णी भाजप : प्रभाकर शिंदे, अॅड मकरंद नार्वेकर, राजेश्री शिरवडकर, हरीष भांदीर्गे, अलका केरकर, प्रकाश दरेकर, गणेश खणकर, सुषम सावंत, निल सोमय्या, नवनाथ बन, राखी जाधव, स्वप्ना म्हात्रे, तेजिंदरसिंग तिवाना, शिवसेना : तृष्णा विश्वासराव, अमेय घोले, अंजली नाईक, सगुण नाईक, विजेंद्र शिंदे उबाठा : किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, प्रमोद सावंत, रमाकांत रहाटे, काँग्रेस: अश्रफ आझमी एमआयएम : विजय उबाळे मनसे : यशवंत किल्लेदार.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र