वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखर परिषदेची दावोस येथे सांगता, सकारात्मक आंतरदेशीय संबंधावर विकास अवलंबून असल्याचे अधोरेखित

दावोस: जागतिक अर्थकारणात महत्वाचे स्थान ग्रहण करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेची अखेर सांगता झाली आहे. या परिषदेत जगभरातील अर्थकारणातील मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करतात व आर्थिक करारही मंजूर करतात. या अत्यंत महत्वाच्या परिषदेची अखेर सांगता झाली असताना या ५६ व्या वार्षिक बैठकीने निर्णयकर्त्यांना (Decision Makers) व धोरणकर्त्यांना (Policymakers) एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यासपीठ म्हणून काम केले. या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण संवादाने आज जगासमोर असलेल्या सर्वात आव्हानात्मक समस्यांवर प्रगती साधण्यास मदत झाली. संस्थेनेच दिलेल्या माहितीनुसार १३० देशांमधील विविध प्रदेश, क्षेत्र आणि पिढ्यांमधील जवळपास ३००० औद्योगिक नेते एकत्र आले असून ज्यामध्ये विक्रमी ४०० सर्वोच्च राजकीय नेते, जवळपास ६५ राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख, जी७ देशांमधील बहुसंख्य नेते, जगातील जवळपास ८३० सर्वोच्च सीईओ आणि अध्यक्ष, आणि जवळपास ८० आघाडीच्या युनिकॉर्न कंपन्यांचे प्रतिनिधी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींचा समावेश होता.


यामध्ये आर्थिक व भूराजकीय अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली आहे. तज्ञांनी नोव्हेंबरमधील व्यापार करारानंतर अमेरिका-चीन संबंधांच्या दिशेचे मूल्यांकन केले आणि एकूणच जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील जागतिक आर्थिक स्थिरता व भूराजकीय स्पर्धेवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला गेला असे सांगण्यात येत आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) माहितीनुसार, अर्थशास्त्रातील पाच नोबेल पारितोषिक विजेत्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्यांचे नवीनतम संशोधन आणि अंतर्दृष्टीही यावेळी सादर केली.माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हा अनिश्चिततेचा, पण संधींचाही क्षण आहे माघार घेण्याचा नाही, तर सहभागी होण्याचा क्षण आहे असे आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे म्हणाले आहेत.जागतिक आर्थिक मंच सध्याच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याबद्दल आहे असे ब्रेंडे यांनी पुढे सांगितले.


अस्थिरतेच्या काळातही अर्थव्यवस्थेची सापेक्ष लवचिकता अधोरेखित या परिषदेत अधोरेखित करण्यात आली आहेत. मालमत्ता मूल्यांकनातील अनिश्चितता, सार्वभौम कर्जाचे संकट आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) अंमलबजावणीच्या बाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. विशेषतः या परिषदेतील अधोरेखित मुद्दा म्हणजे एआय होती. या विषयावर बोलताना,' एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही श्रम बाजारावर आदळणारी त्सुनामी आहे आणि अगदी सर्वोत्तम तयारी असलेल्या देशांमध्येही मला वाटत नाही की आपण पुरेसे तयार आहोत' असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.


मी विकसनशील देशांना हा सल्ला देईन की, तुम्ही तुमची पायाभूत सुविधा विकसित करा, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) सहभागी व्हा आणि हे ओळखा की एआय (AI) मुळे तंत्रज्ञानातील दरी कमी होण्याची शक्यता आहे असे एनव्हिडियाचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग म्हणाले आहेत. विविध उद्योगपती व्यवसायिक नेत्यांनी जागतिक व्यापारातील विशेषतः जगातील काही सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या फुटीबद्दल सावध केले असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या परस्पर फायदेशीर संबंधावर आपला कल असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Vande Bharat : पुणे-बंगळूरू प्रवास होणार सुपरफास्ट! अत्याधुनिक सुविधांसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

पुणे : भारतीय रेल्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुणेकरांसाठी एक मोठी

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Nari Shakti Vandan Adhiniyam : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक भारताचे भविष्य बदलेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; महिला खासदारांची संख्या ४० टक्के पार होणार मुंबई : मोदी सरकारने

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी