वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखर परिषदेची दावोस येथे सांगता, सकारात्मक आंतरदेशीय संबंधावर विकास अवलंबून असल्याचे अधोरेखित

दावोस: जागतिक अर्थकारणात महत्वाचे स्थान ग्रहण करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील परिषदेची अखेर सांगता झाली आहे. या परिषदेत जगभरातील अर्थकारणातील मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करतात व आर्थिक करारही मंजूर करतात. या अत्यंत महत्वाच्या परिषदेची अखेर सांगता झाली असताना या ५६ व्या वार्षिक बैठकीने निर्णयकर्त्यांना (Decision Makers) व धोरणकर्त्यांना (Policymakers) एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य व्यासपीठ म्हणून काम केले. या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण संवादाने आज जगासमोर असलेल्या सर्वात आव्हानात्मक समस्यांवर प्रगती साधण्यास मदत झाली. संस्थेनेच दिलेल्या माहितीनुसार १३० देशांमधील विविध प्रदेश, क्षेत्र आणि पिढ्यांमधील जवळपास ३००० औद्योगिक नेते एकत्र आले असून ज्यामध्ये विक्रमी ४०० सर्वोच्च राजकीय नेते, जवळपास ६५ राष्ट्राध्यक्ष आणि सरकार प्रमुख, जी७ देशांमधील बहुसंख्य नेते, जगातील जवळपास ८३० सर्वोच्च सीईओ आणि अध्यक्ष, आणि जवळपास ८० आघाडीच्या युनिकॉर्न कंपन्यांचे प्रतिनिधी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींचा समावेश होता.


यामध्ये आर्थिक व भूराजकीय अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली आहे. तज्ञांनी नोव्हेंबरमधील व्यापार करारानंतर अमेरिका-चीन संबंधांच्या दिशेचे मूल्यांकन केले आणि एकूणच जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील जागतिक आर्थिक स्थिरता व भूराजकीय स्पर्धेवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला गेला असे सांगण्यात येत आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) माहितीनुसार, अर्थशास्त्रातील पाच नोबेल पारितोषिक विजेत्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्यांचे नवीनतम संशोधन आणि अंतर्दृष्टीही यावेळी सादर केली.माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हा अनिश्चिततेचा, पण संधींचाही क्षण आहे माघार घेण्याचा नाही, तर सहभागी होण्याचा क्षण आहे असे आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे म्हणाले आहेत.जागतिक आर्थिक मंच सध्याच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याबद्दल आहे असे ब्रेंडे यांनी पुढे सांगितले.


अस्थिरतेच्या काळातही अर्थव्यवस्थेची सापेक्ष लवचिकता अधोरेखित या परिषदेत अधोरेखित करण्यात आली आहेत. मालमत्ता मूल्यांकनातील अनिश्चितता, सार्वभौम कर्जाचे संकट आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) अंमलबजावणीच्या बाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. विशेषतः या परिषदेतील अधोरेखित मुद्दा म्हणजे एआय होती. या विषयावर बोलताना,' एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही श्रम बाजारावर आदळणारी त्सुनामी आहे आणि अगदी सर्वोत्तम तयारी असलेल्या देशांमध्येही मला वाटत नाही की आपण पुरेसे तयार आहोत' असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या.


मी विकसनशील देशांना हा सल्ला देईन की, तुम्ही तुमची पायाभूत सुविधा विकसित करा, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) सहभागी व्हा आणि हे ओळखा की एआय (AI) मुळे तंत्रज्ञानातील दरी कमी होण्याची शक्यता आहे असे एनव्हिडियाचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग म्हणाले आहेत. विविध उद्योगपती व्यवसायिक नेत्यांनी जागतिक व्यापारातील विशेषतः जगातील काही सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या फुटीबद्दल सावध केले असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या परस्पर फायदेशीर संबंधावर आपला कल असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास,

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Deputy Chief Minister Eknath Shinde : कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही !

अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या