वाहतुकीच्या नियमाचे एका वर्षात पाच वेळा उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. आता सिग्नल तोडणं किंवा कोणतेही वाहतुकीचे नियम तोडणं चांगलंच महागात पडणार आहे. जर एका वर्षात तुम्ही पाचवेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यासाठी रद्द होऊ शकतं. ही ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूद दळणवळण मंत्रालयाच्या नवीन मोटर व्हेइकल सुधारणा नियमात करण्यात आल्याचे वृत्त आहे. १जानेवारीपासून लागू झालेले हे नियम भारतीय रस्त्यांवर शिस्त आणण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल मानले जात आहे. सरकारचा स्पष्ट संदेश असा आहे की, नियम मोडल्याबद्दल दंड भरून वाहनचालक आता सुटू शकत नाहीत; त्याऐवजी, त्यांनी त्यांचा परवाना वाचवण्यासाठी प्रत्येक लहान किंवा मोठा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. नवीन मोटर वाहन नियमांनुसार, आता आरटीओ आणि जिल्हा परिवहन कार्यालयांना ही शक्ती दिली आहे की, ते वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांच्या लायसेन्सवर निलंबनाची कारवाई सुरु करु शकतील. खरंतर असं करण्यापूर्वी परवाना धारकाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. अधिसूचनेमध्ये सांगितले आहे की, उल्लंघनाची गणना एक वर्षाच्या कालावधीच्या आत केली जाईल. चांगली बातमी अशी आहे की मागील वर्षातील उल्लंघने पुढील वर्षाच्या गणनेत जोडली जाणार नाहीत, म्हणजेच, उल्लंघनाची नोंद दरवर्षी आपोआप शून्य मानली जाईल. नव्या तरतुदीनुसार पाच वाहतुकीसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये हेलमेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल मोडणे या सारख्या तुलनेनं कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला.

Comments
Add Comment

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता

योग, आयुर्वेद अन् ॲलोपॅथीचा संगम

गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते 'हायब्रिड' पतंजली रुग्णालयाचे उद्घाटन  हरिद्वार  : भारताच्या आरोग्य क्षेत्रात

चारही पीठांचे शंकराचार्य १९ वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार

दिल्लीत गोमाता रक्षणासाठी १० मार्चला कार्यक्रम नवी दिल्ली: ज्योतिषपीठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी