महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ईडीकडूनही भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर टांगती तलवार असलेल्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आधी एसीबी आणि आता ईडी, अशा दोन्ही यंत्रणांकडून भुजबळ आता पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले आहेत.


दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल ८५० कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात केवळ राजकीय चर्चाच झाली नाही, तर भुजबळांना दोन वर्षे तुरुंगातही राहावे लागले होते. त्यांच्यासह एकूण १४ जणांची नावे या कथित घोटाळ्यात गुंतलेली होती. मात्र, प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर आता त्यांच्यावरील सर्व आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे.


काही काळापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्याअभावी भुजबळांना दोषमुक्त केले होते. मुख्य गुन्हाच सिद्ध न झाल्याने ईडीनेही आता त्यांच्या निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर केला आहे. या क्लिनचीटमुळे भुजबळ आता कायदेशीर कचाट्यातून पूर्णपणे बाहेर आले आहेत. छगन भुजबळ आणि इतर सह-आरोपींनी निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ईडीचा खटला रद्दबातल ठरवत भुजबळांना दोषमुक्त केले.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! निकटवर्तीय चंद्रिमा भट्टाचार्यांचा टीएमसीतील सर्व पदांचा राजीनामा; बंगालच्या राजकारणात खळबळ

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत सापडलेल्या

Vaibhav Suryavanshi Debut : भारतीय संघात अखेर 'वैभव' पर्व सुरु! १५ व्या वर्षात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू

- सचिन तेंडुलकर आणि स्मृती मंधानाला मागे टाकत रचला इतिहास भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच