पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी


दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहारमध्ये सखोल मतदान पुनरावलोकन (एसआयआर / SIR / Special Intensive Revision) संदर्भातील तणाव आणि हिंसात्मक परिस्थिती निर्माण झाली. एका इसमाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आणि एसआयआर सुनावणीच्या भीतीमुळे त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केला. यानंतर संतप्त जमावाने एका शाळेत चालू असलेल्या एसआयआर सुनावणी केंद्रावर हल्ला केला.


इटाहारच्या मुराळीपुकुर गावातील चंदू सरकार नामक इसमाचा मृतदेह त्यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर गळफास घेतलेले आढळले. नातेवाईकांच्या मते, त्याची पत्नी जिन्नातून खातून यांच्या नावावर एसआयआर सुनावणीची नोटीस मिळाल्यानंतरच तो तणावाखाली होता. पत्नीला घेऊन सुनावणी शिबिरात जाण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. चंदूच्या मृत्यूची बातमी पसरताच शेकडो लोक काठ्या घेऊन इटाहार हायस्कूलवर पोहोचले, जिथे त्या वेळेस एसआयआर सुनावणी चालू होती. संतप्त जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी अधिकारी कसेबसे जीव वाचवून पळाले. त्यानंतर जमावाने परीराजपूर परिसरातील अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात अनेक अधिकाऱ्यांना जखमा झाल्या. टेबल, खुर्च्या आणि बेंच तुटवून फेकल्या गेल्या. महत्वाचे दस्तऐवज फाडून पसरवले गेले. घटनेच्या वेळी शाळा सुरू असल्याने हा हिंसक प्रकार पाहून शिक्षक आणि विद्यार्थी घाबरून गेले होते. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रायगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंतल बंद्योपाध्यायही घटनास्थळी पोहोचले. काही तासांपर्यंत सुनावणी पूर्णपणे थांबवण्यात आली. नंतर कडक सुरक्षा ठेवून सुनावणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. दुसरीकडे, चंदू सरकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना इटाहार चौकावर १२ नंबर राष्ट्रीय महामार्गावर तृणमूल काँग्रेसचे आमदार मुशर्रफ हुसैन आणि त्यांच्या समर्थकांनी विरोध करत रस्त्यावर अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय