गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा


मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील नऊ विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असला, तरी सत्र न्यायालयाने विद्यार्थ्यांना फटकारले आहे.


सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करताना विद्यार्थ्यांना थेट इशारा दिला की, “तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा नोकरीवर परिणाम होईल. तुमचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.”


“सरकारी नोकरी मिळणार नाही…”


सुनावणीदरम्यान हे नऊ विद्यार्थी कोर्टरूमच्या मागच्या बाजूला रांगेत उभे होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज बी. ओझा यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. “तुमच्यातले किती जण महाराष्ट्राबाहेरचे आहेत? तुम्ही महाराष्ट्रात शिक्षणासाठी


आलात, आणि हे सगळे करताय? तुमच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती आहे का?” यानंतर न्यायाधीश म्हणाले, “या केसमुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. आणि खासगी क्षेत्रात नोकरी करताना देखील तुमच्यावर गुन्हा सुरू असल्याची माहिती द्यावी लागेल.”


न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले,“आता तुमचे गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झाले आहे. ते केवळ इथल्या पोलिसांकडे नाही, तर देशभरात उपलब्ध असणार आहे. करिअर सुरू होण्याआधीच तुम्ही मोठी चूक केली आहे.”


न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या वकिलांना ते कोणता अभ्यासक्रम शिकत आहेत, हेही विचारले. वकिलांनी सांगितले की हे विद्यार्थी मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यु) करत आहेत. यावर न्यायाधीश म्हणाले की, “तुमच्या डिग्रीमुळे तुम्हाला नोकरी मिळेलच असे नाही. तुम्हाला वाटतेय का की तुम्ही वैज्ञानिक किंवा इंजिनिअर आहात?” असा टोमणा त्यांनी मारला.


दरम्यान, या नऊ विद्यार्थ्यांवर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. विद्यार्थ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून प्रकरणाची सुनावणी अजून सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण 

येत्या 26 जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र   मुंबई (विशेष प्रतिनिधी ) उच्‍च

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात