माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी 'तात्पुरता मंडप उभारणी' परवानगीकरिता ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन नद्या,समुद्र,तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये न करता; महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.


माघी श्रीगणेशोत्सवात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व आवश्यक उपाययोजना व अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ तसेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी जारी केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणीही सुयोग्य प्रकारे करण्यात येत आहे.


६ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी तसेच भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना