ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान भरून काढण्याचा मार्ग शोधत असतानाच, गुगलने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला आता एकप्राकरे लॉटरीच लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, यामुळे बोर्ड एकाच हंगामात करोडो रुपये कमवू शकणार आहे. बीसीसीआय लवकरच या भागीदारीची घोषणा करू शकते.


एआय आता क्रिकेटच्या जगातही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणूनच ते सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे. गुगलचा प्रगत एआय प्लॅटफॉर्म 'जेमिनी' इंडियन प्रीमियर लीग चा अधिकृत भागीदार बनण्याची शक्यता आहे. ही भागीदारी २०२६ ते २०२८ या हंगामांकरिता असेल. या करारामुळे भारतीय क्रिकेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होईल, ज्यामुळे चाहत्यांच्या अनुभवात बदल होण्याची शक्यता आहे. गुगलने या भागीदारीसाठी अंदाजे ₹२७० कोटी गुंतवले आहेत. यामध्ये प्रत्येक आयपीएल हंगामासाठी सुमारे रू.९० कोटींचा समावेश आहे. आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे, 'जेमिनी' प्लॅटफॉर्म भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सामन्यादरम्यान एआय-आधारित आकडेवारी, खेळाडूंची कामगिरी आणि क्षणांचे विश्लेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले जाईल, ज्यामुळे संघांना धोरण ठरवण्यास मदत मिळेल. चाहत्यांच्या आवडीनुसार सामन्याचे हायलाइट्स आणि सामग्री तयार केली जाईल. एआय-आधारित गेम्स आणि अनुभवाद्वारे चाहत्यांना आयपीएलमध्ये सहभागी करून घेतले जाईल. याआधी ‘चॅट जीपीटी’ने वुमेन्स प्रीमियर लीग २०२६मध्ये भागीदारी केली होती. हा करार बोर्डाने दोन वर्षांसाठी १६ कोटी रुपयांना केला होता. ड्रीम ११ टीम इंडियाचे जर्सी स्पॉन्सर होते. त्यांनी माघार घेतल्यानंतर, अनेक कंपन्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी हा करार शेवटी अपोलो टायर्सकडे गेला, ज्यांनी ५५४ कोटी दिले होते. अर्थात गुगल आणि आयपीएलची ही भागीदारी क्रीडा मनोरंजनाची दिशा ठरवणारी ठरू शकते.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)