कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर सुरू होत आहे. हा सामना भारतीय क्रिकेटसाठी आणि विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच सूर्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामन्यांचा टप्पा ओलांडणारा सूर्यकुमार हा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा मान रोहित शर्मा (१५९ सामने), विराट कोहली (१२५ सामने) आणि हार्दिक पांड्या (१२४ सामने) यांच्याकडे आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यादेखील विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची शक्यता आहे. केवळ सामन्यांचेच शतक नव्हे, तर सूर्यकुमारला या मालिकेत षटकारांचे 'चौकार' ठोकण्याचीही मोठी संधी आहे. त्याने आतापर्यंत विविध टी-२० सामन्यांत ३९५ षटकार ठोकले आहेत. या मालिकेत त्याने आणखी ५ षटकार लगावल्यास, टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडणारा तो रोहित शर्मा (५४७) आणि विराट कोहली (४३५) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरेल.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य