समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित होता. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे प्रगतीशील विचारांचे समर्थक आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती होते. गायकवाडाला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो चार वर्षांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरात राहात होता. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा गायकवाड मृत्यूनंतर तपास यंत्रणांसमोर या प्रकरणातील इतर आरोपी समोर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. न्यायालयात हत्याकांडाचे खटले सुरु आहेत, परंतु गायकवाडच्या निधनामुळे प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा या घटनेची नोंद घेत, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.