Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू झाला. माहितीप्रमाणे,डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. समीर गायकवाडची रात्रीच्या सुमारास अचानक तब्येत बिघडल्याने त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित होता. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे प्रगतीशील विचारांचे समर्थक आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती होते. गायकवाडाला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो चार वर्षांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरात राहात होता. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा गायकवाड मृत्यूनंतर तपास यंत्रणांसमोर या प्रकरणातील इतर आरोपी समोर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. न्यायालयात हत्याकांडाचे खटले सुरु आहेत, परंतु गायकवाडच्या निधनामुळे प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा या घटनेची नोंद घेत, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.
Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)