Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू झाला. माहितीप्रमाणे,डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. समीर गायकवाडची रात्रीच्या सुमारास अचानक तब्येत बिघडल्याने त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित होता. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे प्रगतीशील विचारांचे समर्थक आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती होते. गायकवाडाला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो चार वर्षांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरात राहात होता. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा गायकवाड मृत्यूनंतर तपास यंत्रणांसमोर या प्रकरणातील इतर आरोपी समोर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. न्यायालयात हत्याकांडाचे खटले सुरु आहेत, परंतु गायकवाडच्या निधनामुळे प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा या घटनेची नोंद घेत, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.
Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार