Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू झाला. माहितीप्रमाणे,डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. समीर गायकवाडची रात्रीच्या सुमारास अचानक तब्येत बिघडल्याने त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक असून गोविंद पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित होता. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पानसरे हे प्रगतीशील विचारांचे समर्थक आणि सामाजिक वर्तुळात प्रभावशाली व्यक्ती होते. गायकवाडाला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो चार वर्षांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. तेव्हापासून तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरात राहात होता. या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा गायकवाड मृत्यूनंतर तपास यंत्रणांसमोर या प्रकरणातील इतर आरोपी समोर आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

समीर गायकवाडच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. न्यायालयात हत्याकांडाचे खटले सुरु आहेत, परंतु गायकवाडच्या निधनामुळे प्रकरणाच्या पुढील तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि पोलिस तपास यंत्रणा या घटनेची नोंद घेत, प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने काम करत आहेत.
Comments
Add Comment

प्रत्येक मेट्रो रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या क्षमतेचे पंप; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या

भाजपाच्या हाती मुंबईकरांचे आरोग्य; सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सहा विशेष समिती अध्यक्षपदासाठी अखेर भाजप आणि शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची नावे

Mumbai: भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात इमारतीचा भाग कोसळला

मुंबई: मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. अत्यंत रहदारीचा असलेल्या या

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय