सात रुपयांचे चोरी प्रकरण; ५० वर्षांपूर्वीचा खटला बंद

मुंबई : ७ रुपयांच्या चोरीच्या घटनेनंतर जवळपास ५० वर्षांनी मुंबईतील एका न्यायालयाने अखेरीस १९७७ सालच्या एका जुन्या प्रकरणावर पडदा टाकला. या प्रकरणात दोन अज्ञात आरोपी होते आणि अनेक दशकांच्या पोलीस शोधानंतरही तक्रारदार बेपत्ताच राहिला होता. हा निकाल दशकांपासून प्रलंबित असलेल्या आणि कायदेशीर व्यवस्थेवर भार बनलेल्या अनेक जुन्या खटल्यांपैकी एक आहे. माझगाव न्यायालयाने जुने खटले निकाली काढण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १९७७ सालचा हा खटला बंद केला, ज्यामध्ये आरोपी एकतर मरण पावले आहेत किंवा त्यांची ओळख पटलेली नाही किंवा ते बेपत्ता आहेत. ही रक्कम पन्नास वर्षांपूर्वी मोठी होती. जामीनपात्र नसलेले अटक वॉरंट जारी करूनही त्या दोघांचा शोध लागला नाही, ज्यामुळे हे प्रकरण प्रलंबित पडले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (माझगाव न्यायालय) आरती कुलकर्णी यांनी हे प्रकरण बंद केले, कारण हे प्रकरण जवळपास ५० वर्षे जुने होते. त्यात कोणतीही प्रगती न होता ते अनावश्यकपणे प्रलंबित राहिले होते, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला जात आहे. प्रकरण प्रलंबित ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या दोन आरोपींना दोषमुक्त केले आणि चोरीची ७ रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत करण्याचे निर्देश दिले आहेत. जर माहिती देणारा व्यक्ती सापडला नाही, तर अपीलच्या मुदतीनंतर ती रक्कम सरकारी खात्यात जमा केली जाईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८