पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार


पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही मुक्तता न मिळाल्याने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतरही त्याला सोडण्यात आले नाही. या घटनेमुळे सीमारेषा चुकून ओलांडलेल्या निष्पाप मच्छीमारांचे प्राण किती काळ असेच जाणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न मच्छीमार कुटुंबांमधून व्यक्त होत आहे.


शुक्रवारी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याची शिक्षा जवळपास साडेतीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती आणि त्याचे भारतीय नागरिकत्वही सिद्ध झाले होते. अशा परिस्थितीत त्याला केव्हाच मुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षा पूर्ण होऊनही त्याला पाकिस्तानने तुरुंगातच ठेवले आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. “पाकिस्तानच्या तुरुंगात काही भारतीय मच्छीमार आजारी असल्याची माहिती मिळत आहे,” असे शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी सांगितले.


गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारी करताना अनेकदा बोटी चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत जातात. त्यावेळी पाकिस्तानची मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सी मच्छीमारांना अटक करते आणि त्यांना कराचीतील तुरुंगात पाठवले जाते. सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात महाराष्ट्रातील १९ जणांसह भारतातील एकूण १९९ मच्छीमार कैदेत आहेत. त्यापैकी अनेकांची शिक्षा तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. तरीही त्यांची मुक्तता झालेली नाही. त्यामुळे या मच्छीमारांना मानसिक छळ सहन करावा लागत आहे.


घरातील कमावता सदस्य कैदेत असल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. कर्ता पुरुष नसल्याने अनेक कुटुंबे नैराश्यात जगत आहेत. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही कैदेत असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी महिनाभरापूर्वी काही कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती आणि आपल्या आप्तांना मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप परराष्ट्र विभागाकडून ठोस हालचाल दिसून आलेली नाही. भारत सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जतीन देसाई यांनी केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ ६ मार्चला पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांची BAFTA जिंकणारी पहिली भारतीय फिल्म ‘बूंग’ ६

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला

UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईतील नागरिक अडकले; आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवाशांना फटका

रायगड: मध्यपूर्वेत भडकलेल्या तणावाची झळ आता थेट सामान्य प्रवाशांना बसू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.