मुरबाडच्या सरपंच डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विशेष निमंत्रण

लोकसहभागातील विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील किसळ–पारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी डॉ. कविता वरे-भालके यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त दिल्ली येथे विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.


लोकसहभागातून राबवलेल्या विकासकामांची आणि प्रभावी नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे हे महत्त्वाचे प्रतीक मानले जात आहे. यापूर्वीही डॉ. वरे-भालके यांना “पंचायत टू पार्लमेंट” या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांकडून निमंत्रणे मिळाली असून त्यांनी जागतिक व्यासपीठावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे.


ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि लोकशाही मूल्यांच्या बळकटीसाठी त्यांनी केलेले कार्य किसळ–पारगावसह संपूर्ण मुरबाड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची

Decision of State Govt : जिल्हा बँकांतील ७० टक्के जागा यापुढे स्थानिकांसाठी राखीव

राज्य सरकारचा निर्णय; ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नियम लागू मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा