मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएमला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता मनसेची मते ही एआयएमआयएमच्या मतांपेक्षा अधिक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशीरा पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील राजकीय बलाबलाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्ष आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (शिंदे) पक्ष असून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर, एआयएमआयएम पाचव्या क्रमांकावर आहे. तर मनसेला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल आहे.


त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, समाजवादी, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांचा क्रमांक आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात तब्बल २९ विविध पक्ष उतरले होते. त्यापैकी केवळ नऊ पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या मनसेला एआयएमआयएमपेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र मतांच्या टक्केवारीचा आणि आकडेवारीचा विचार केला तर मनसेची मतांची टक्केवारी एआयएमआयएमपेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे