मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएमला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता मनसेची मते ही एआयएमआयएमच्या मतांपेक्षा अधिक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशीरा पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील राजकीय बलाबलाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्ष आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (शिंदे) पक्ष असून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर, एआयएमआयएम पाचव्या क्रमांकावर आहे. तर मनसेला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल आहे.


त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, समाजवादी, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांचा क्रमांक आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात तब्बल २९ विविध पक्ष उतरले होते. त्यापैकी केवळ नऊ पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या मनसेला एआयएमआयएमपेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र मतांच्या टक्केवारीचा आणि आकडेवारीचा विचार केला तर मनसेची मतांची टक्केवारी एआयएमआयएमपेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे