भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नुकतेच भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) brics2026.gov.in आणि लोगोचे उद्घाटन केले. जयशंकर यांनी भारताच्या दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे सांगितले. ब्रिक्स २०२६ चा लोगो केवळ चिन्ह नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि जागतिक ऐक्याचा संदेश आहे.


लोगोची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित असून, मध्यभागी ‘नमस्ते’ मुद्रा स्वागत व आदराचे प्रतीक आहे. लोगोच्या पाकळ्यांमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या ध्वजांचे रंग समाविष्ट आहेत, जे विविधतेत एकता दर्शवतात.


२०२६ मध्ये ब्रिक्स समूहाची स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. जयशंकर यांनी सांगितले की भारत उत्तरेकडील देशांच्या (ग्लोबल साउथ) समस्या जागतिक स्तरावर मांडण्यासाठी संधीचा उपयोग करेल आणि संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) सारख्या संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. वेबसाइट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म नव्याने लाँच करण्यात आलेली वेबसाइट brics2026.gov.in हे बैठका, उपक्रम आणि करारांची माहिती देणारे मुख्य माध्यम असणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि जगाला भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात होणाऱ्या हालचालींची वेळेवर माहिती मिळेल.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत