राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहुमत मिळवले आहे. यात मुंबई मनपाची देशभरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळेच, उद्धवसेना आणि मनसे किती जागा जिंकणार, याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागून होते. मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. आपल्या राजकारणात नेहमी मराठी आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचे, असा मुद्दा मांडणाऱ्या मनसेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राज्यातील २२ शहरांत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नागपूर, परभणी, जालना, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर येथे मनसेचा खातेही उघडलेले नाही.


शहरनिहाय मनसेची स्थिती
मुंबई : ५
कल्याण-डोंबिवली : ४
ठाणे : १
नाशिक : २
नवी मुंबई : १
अहिल्यानगर : ३
उल्हासनगर : १

Comments
Add Comment

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये

 सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी मुंबई

Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!" पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा 'कान्स' दौरा रद्द

मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची

Amruta Fadnavis: इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

 कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुंबई : पंतप्रधान

ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप प्ले-स्टोअरवरून हटवा

परिवहन विभागाचे महाराष्ट्र सायबर विभागाला आदेश; बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर आतापर्यंतची सर्वात मोठी

शहरांमधील बांधकाम आणि पाडकामाच्या ढिगाऱ्यांवर आता सरकारचा 'वॉच'!

 राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन; नियम मोडणाऱ्या विकासकांवर फौजदारी कारवाई मुंबई : इमारतींच्या