Saturday, January 17, 2026

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

राज्यातील २२ मनपात  राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बहुतांश ठिकाणी भाजपने बहुमत मिळवले आहे. यात मुंबई मनपाची देशभरात चर्चा सुरू होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यामुळेच, उद्धवसेना आणि मनसे किती जागा जिंकणार, याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागून होते. मुंबई मनपात प्रथमच भाजपला बहुमत मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. आपल्या राजकारणात नेहमी मराठी आणि स्थानिक विरुद्ध बाहेरचे, असा मुद्दा मांडणाऱ्या मनसेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राज्यातील २२ शहरांत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज, मीरा-भाईंदर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, नागपूर, परभणी, जालना, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर येथे मनसेचा खातेही उघडलेले नाही.

शहरनिहाय मनसेची स्थिती मुंबई : ५ कल्याण-डोंबिवली : ४ ठाणे : १ नाशिक : २ नवी मुंबई : १ अहिल्यानगर : ३ उल्हासनगर : १

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >