Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या अडीच ते तीन तास लागणारा मुंबई–पुणे प्रवास भविष्यात केवळ ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने मुंबई–पुणे दरम्यान सुमारे १३० किलोमीटर लांबीचा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास मंजुरी दिली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज हजारो वाहनांची कोंडी पाहायला मिळते. मात्र खंडाळा घाटातील अरुंद वळणं, पावसाळ्यात होणारी घसरण, अपघात आणि सुट्टीच्या दिवसांतील प्रचंड गर्दी यामुळे प्रवास अनेकदा चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. या कायमस्वरूपी समस्येवर उपाय म्हणून सरकारने सध्याच्या मार्गाच्या समांतर एक अत्याधुनिक आणि वेगवान एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा नवा मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १५ हजार कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात पगोटे ते पनवेल चौक दरम्यानच्या मार्गाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कमी वळणं, सुरक्षित वेगवान लेन, मजबूत पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील अपघातप्रवण भाग टाळले जातील आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल.

या मार्गाचा फायदा केवळ मुंबई–पुणेपुरता मर्यादित राहणार नाही. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे–बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास सुमारे साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि बंदरांशी संबंधित क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा नवा सुपरफास्ट मार्ग उभारत आहेत. हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता नसून, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि दळणवळण विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या