विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी


मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार वर्षांनंतर अव्वल स्थान पटकावले. पण, आयसीसीने याची घोषणा करताना एक मोठी चूक केली होती आणि चाहत्यांनी ती लक्षात आणून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला त्यात सुधारणा करावी लागली. भारत-न्यूझीलंड पहिल्या वन डे सामन्यात विराटने ९३ धावांची खेळी केली होती आणि जुलै २०२१ नंतर वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. आयसीसीने जाहीर केलेल्या या बातमीत सर्वाधिक काळ वन डे फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर राहणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट ८२५ दिवसांसह दहाव्या क्रमांकावर होता.


पण, आयसीसीने ती चूक सुधारली आणि कोहली ८२५ दिवस नव्हे तर १५४७ दिवस वन डे फलंदाजांच्या अव्वल क्रमांकावर विराजमान असल्याचे जाहीर केले. त्यामुळे तो सर्वाधिक काळ अव्वल राहिलेल्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज ब्रायन लारा (२०७९) व व्हीव्ह रिचर्ड्स (२३०६) हे विराटच्या पुढे आहेत. १,५४७ दिवसांच्या सुधारणेसह कोहलीने अनेक समकालीन महान खेळाडूंना मागे टाकले आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये, कोहलीने पहिल्यांदाच अव्वल क्रमांक मिळवला आणि त्यानंतर त्याने दहा वेळा तो पुन्हा मिळवला आहे. ज्यामुळे वन डे क्रिकेटमधील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून त्याची दीर्घकालीन प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.


विराटचे अव्वल स्थान संकटात


आयसीसीने १४ जानेवारील वन डे क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आणि कोहली हिटमॅन रोहितला मागे सोडून नंबर वन फलंदाज बनला. रोहितची तिसऱ्या स्थानी घसरण झाली, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल दुसऱ्या क्रमांकावर आला. आता विराट व मिचेल यांच्यात फक्त (७८५-७८४) एका गुणाचा फरक आहे, तर रोहित ७७५ रेटिंग पॉइंटसह तिसरा आहे. पण कोहलीचे अव्वल स्थान संकटात आले आहेत. कारण मिचेल व रोहित यांच्या आणि विराटच्या गुणांत फार फरक नाही. विराट दुसऱ्या सामन्यात २३ धावांवर बाद झाला आणि रोहितलाही २४ धावा करता आल्या. पण, मिचेलने सातत्य राखताना आणखी एक अर्धशतकीय खेळी केली. त्यामुळे आता ताजी क्रमवारी जाहीर झाल्यास मिचेल वन डे क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनले.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील