लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले


लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या चुकीच्या प्रचाराची अप्रत्यक्षपणे साथच मिळाली आणि अमित देशमुख यांनी लातूर महापालिकेत कॉग्रेसचा झेंडा उंच राखता आला. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या विरोधातील वक्तव्य लातूरकर सहन करत नाहीत, असा संदेशही लातूरकरांनी दिल्याचे मानले जात आहे. मराठवाड्यात कॉग्रेस वर्चस्वाची ही एकमेव महापालिका आहे. एकूण ७० जागांपैकी कॉग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागा जिंकल्या. वंचित बहुजन आघाडीने पाच जागा पटकावल्या. भाजपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आणि भाजपचे सत्तास्वप्न भंगले.


कॉग्रेसचे नेते अमित देशमुख यांची या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कलेल्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे कॉग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला. या निवडणुकीत लिंगायत मतदान पूर्णत: कॉग्रेसच्या बाजूने वळले. वंचित आघाडीबरोबर युती केल्याने दलित, मुस्लिम आणि लिंगायत अशी मतपेढी निर्माण झाली. त्यामुळे कॉग्रेसचा विजय झाल्याचे मानले जात आहे.


प्रचारादरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, तसेच राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी नेत्यांनी अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र त्यांना कोणतेही प्रतिउत्तर अमित देशमुख यांनी दिले नाही.


विजयानंतर अमित देशमुख म्हणाले, ‘ लातूर हे विलासराव देशमुख यांचे शहर आहे. लातूरकर आपल्या अस्मितेवर आणि ओळखीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मतदानातून उत्तर देतात.’ त्यामुळे लातूरमध्ये हातच भारी ठरली. शिवसेना आणि राष्ट्रावादी कॉग्रेसला खातेही उघडता आले नाही. लातूरमध्ये पहिल्यांदाच स्वतंत्र ताकदीने लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. पूर्व भागात एमआयएम उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळेही राष्ट्रवादीला नुकसान झाल्याचे चित्र आहे.


महापालिकेत पक्षनिहाय बलाबल असे


काँग्रेस वंचित आघाडी : ४७ (यात चार वंचित)


भाजप : २२ राष्ट्रवादी अजित पवार : ०१

Comments
Add Comment

Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय सुरक्षा

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

POP Ganesh Idol Ban Decision 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

Pradhan Mantri pik vima yojana : एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासा! पीक विमा योजनेची मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढली

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri pik vima yojana) सहभागी

Annabhau Sathe Jayanti : जाणून घेऊया; दीड दिवस शाळा शिकलेल्या लोकशाहिराचा जीवनप्रवास

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने १