भाजप एका जागेवरून ४३ जागांवर

बहुजन विकास आघाडीच्या ३७ जागा घटल्या


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकल्या आहेत आणि स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भारतीय जनता पक्ष हा ४३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सन २०१५ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपच्या तब्बल ४३ जागा वाढल्या असून, बहुजन विकास आघाडीच्या मात्र ३७ जागा घटल्या आहेत. त्यामुळे भाजप हा पक्ष सत्तेच्या जवळ गेला नसला तरी त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.


यापूर्वी दोन निवडणुका पार पडल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये येथे बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत, तर ११५ जागांपैकी १०७ जागांवर बहुजन विकास आघाडीने विजय मिळवून महापालिकेत त्यांचे एकहा ती वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, सन २०२० मध्ये महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणुका झाल्या नाही. मात्र गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हातून बोईसर, वसई आणि नालासोपारा हे तीनही मतदारसंघ गेले. त्यामुळे यावेळी होत असलेली महापालिकेची निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीची साथ सोडली. मात्र वसई विरार मधील मतदारांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडली नाही. आणि या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला महापालिकेच्या सभागृहात सत्तास्थापन करण्यासाठी बहुमत मिळवून दिले. तर दुसरीकडे पालघर लोकसभा, पाच विधानसभा आणि नुकताच झालेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना यांनी आगरी सेना, श्रमजीवीला सोबत घेऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढविली. शिवसेनेला २७ पैकी केवळ एक जागा निवडून आणता आली, तर भाजपचे ९३ उमेदवारांपैकी ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ एक जागा निवडून आलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४३ जागा जिंकल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


वसई-विरारकरांनी दिलेला कौल मान्य आहे. भाजपचे तळागाळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे ४२ जागा जिंकता आल्या आहेत. विरोधकांनी मतदारांमध्ये विविध प्रकारचा अपप्रचार केल्याने काही जागांवर फटका बसला आहे. माझ्यासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता नगरसेवक नाही तर सेवक म्हणून वसई-विरारमध्ये सेवा करत राहील.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर.

Comments
Add Comment

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना