लवकरच बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई होणार, मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई : राज्यातील २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. मुंबईसह २१ महापालिकांमध्ये भाजप तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली मनपात शिवसेना मोठा पक्ष झाला आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीसाठी आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी फडणवीस सरकारच्या एका महत्त्वाच्या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली.


महापालिकांसाठी प्रचार करताना संकेत दिले होते त्याप्रमाणे लवकरच घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला जाईल; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. मुंबईसह राज्यात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या सर्व घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई होईल; असे नितेश राणे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कॅमेरा - माईक घेऊन तयार राहावे. लवकरच कारवाई होताना दिसेल, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मतदारांनी मुंबईसह राज्यात विकासकामं करणाऱ्या भाजप महायुतीला भरभरुन मतं दिली आहे. मतदारांचा विश्वास भाजप महायुती सार्थ ठरवेल, असे स्पष्ट संकेत मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुंबईसह सर्वच शहरांमध्ये विकासकामांना चालना दिली जाईल. विकासातून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल; अशी माहितीही त्यांनी दिली.


मुंबई महापालिकेत १९९७ पासून एकाच पक्षाची सत्ता आहे. पण उद्धव यांनी सत्ता हाती असताना विकासाऐवजी भलत्याच कामांना प्राधान्य दिले. महापालिकेतले त्यावेळचे सत्ताधारी स्वार्थ साधण्यात गुंतले होते. पण आता चित्र बदलेल. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये विकासाला गती देण्यावर भाजप महायुती भर देणार असल्याचे मंत्री नितेश राणेंनी सांगितले.


मनपा निवडणुकांच्यावेळी हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. पण त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक राजकारणाचा फायदा घेऊ एमआयएमचे १२५ जण निवडून आले. यातून बोध घेऊन हिंदूंनी एकजूट करावी असे नितेश राणे म्हणाले.महायुतीची सत्ता आली आहे. आता मुंबईत महायुतीचाच हिंदू मराठी महापौर होणार अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली.

Comments
Add Comment

BMC News : बेस्ट उपक्रमाने, महापालिकेपुढे पसरला शेवटचा हात

बेस्टची समक्षीकरणाच्या दिशेने वाटचाल मुंबई : तोट्यात चाललेल्या बेस्टला (BEST) आर्थिक सक्षम करण्यासाठी

ASHA Workers : राज्यातील ८४ हजार आशा स्वयंसेविकांना मिळणार विमा संरक्षण

प्रस्ताव सादर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश; आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, रेशन दुकानातील

Nashik : नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! बाजारातभावात मोठा बदल

Nashik : नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावामुळे चिंतेत आहे. दरम्यान आता नाशिकच्या कांदा

Raj Thackeray : जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरेंची भेट; मागितली माफी

मुंबई : काही दिवसांपूर्वी मालाड (Malad) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक

Venezuela Earthquakes : व्हेनेझुएलात आलेल्या दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी, भूकंपानंतरचे भयावह फोटो, व्हिडीओ होऊ लागले व्हायरल

कॅराकस : व्हेनेझुएलात बुधवारी ४० सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिला भूकंप ७.२ रिश्टर क्षमतेचा तर

BMC : मुंबईतील ओसी (OC) नसलेल्या इमारतींसाठीची ‘अभय योजना’ स्थायी समितीने राखून ठेवली

मुंबई: मुंबईतील ज्या इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र (OC) नाही, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्तावित केलेली 'अभय