दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपुटनुसार, २६  जानेवारीपूर्वी देशविरोधी कारवायांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी गटांशी तसेच शेजारील देशातील काही कट्टरपंथी संघटनांशी संबंधित नेटवर्क सक्रिय असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही आंतरराष्ट्रीय हँडलर्स स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गुप्तचर अहवालात पंजाबमधील काही कुख्यात गटांचे संबंध दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कार्यरत असलेल्या गुन्हेगारी साखळीशी जोडले जात असल्याचा उल्लेख आहे. यामुळे या भागांतील गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


याआधी नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे.


प्रजासत्ताक दिन संचलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी राजधानीतील संवेदनशील ठिकाणी तयारीची चाचणी घेतली. कर्तव्य पथासह लाल किल्ला परिसर, कश्मीरी गेट, चांदणी चौक आणि काही प्रमुख मेट्रो स्थानकांवर मॉक ड्रिल राबवण्यात आली. या सरावाचा उद्देश संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी