जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे. पालिकेतील एकूण ४६ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक जागेवर पक्षाला विजय मिळाला. या निकालामुळे जळगावमध्ये भाजपचा प्रभाव अधिक ठळकपणे समोर आला आहे.

या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिक या महापालिकांमध्ये पक्षाला मजबूत कामगिरी करता यावी यासाठी त्यांनी आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.

धुळे महापालिकेतही भाजप अनेक प्रभागांमध्ये आघाडीवर असून, सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. नाशिकमध्येही भाजपने प्रभावी कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच पालिकांमध्ये भाजपची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.

जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर ही संख्या वाढली. यामुळे निवडणुकीआधीच पक्षांना बळ मिळाले होते. या निकालांमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट झाले असून, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची आणि राजकीय अनुभवाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
Comments
Add Comment

Weather Update : हवामानाचा ‘डबल अटॅक’! मुंबईत उकाड्याचा कहर तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी (२७ मार्च)

CM Devendra Fadnavis : राज्यात पीएनजीला वेग, खतसाठ्यावर सतत नजर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण अवलंबले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली

सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा