तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे ही जागा भाजपासाठी मान, सन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.


भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक वैविध्याने नटलेल्या वार्ड ४७ मध्ये विजय मिळवणे भाजपासाठी मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत या वार्डमधून भाजपाला विजय मिळवून देण्याची क्षमता केवळ तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्यातच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


या वार्डातील मतदारसंरचनेत सुमारे २२ टक्के मराठी, २१ टक्के दक्षिण भारतीय, १२ टक्के ख्रिश्चन आणि ६ टक्के मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेससारख्या पक्षांसाठी हा प्रभाग सहज विजयाचा मानला जात होता. दुसरीकडे भाजपाचे पारंपरिक मतदार—१७ टक्के उत्तर भारतीय/पंजाबी आणि १८ टक्के गुजराती/राजस्थानी—लक्षणीय संख्येत असले तरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे अनेक मतदार वार्डाबाहेर स्थलांतरित झाले होते. त्यातच मतदानाचा दिवस मकर संक्रांतीचा असल्याने गुजराती मतदारांची अनुपस्थिती हे मोठे आव्हान होते.


या सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत मिळवलेला हा विजय तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्या अथक मेहनतीचा, स्थानिक पातळीवरील प्रचंड स्वीकारार्हतेचा आणि घरोघरी पोहोचलेल्या प्रभावी जनसंपर्काचा परिणाम आहे.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना आणि त्यांचे कुटुंब गेली ४० हून अधिक वर्षे या परिसरात सातत्याने जनसेवा करत आहे. कोणताही पदभार नसतानाही नागरिकांच्या अडचणींसाठी २४x७ उपलब्ध राहण्याची त्यांची परंपरा असल्यामुळेच परिसरातील जनतेचा त्यांच्या कुटुंबावर दृढ विश्वास आहे.


या विजयाचे श्रेय भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वालाही जाते, ज्यांनी युवकांवर विश्वास टाकत त्यांना संधी दिली. युवकांनी आपल्या नव्या विचारसरणी, ऊर्जेने आणि संघटन कौशल्याने या बीएमसी निवडणुकीचे राजकीय चित्रच बदलून टाकले आहे.
तेजिंदर यांचे “मदत का ठिकाना” हे अभिनव अभियान या निवडणुकीची ओळख ठरले. या अभियानामुळे निर्माण झालेला उत्साह नगरसेवक निवडणुकीपुरता मर्यादित न राहता विधानसभा निवडणुकीसारखा भासू लागला. अभियानातील गीते, जाहिरात चित्रफिती आणि सोशल मीडियावरील प्रभावी संवाद थेट जनतेच्या हृदयाला भिडला.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा हा विजय खऱ्या अर्थाने मुंबईच्या स्पिरिटचा विजय आहे—जिथे भाषा, प्रांत आणि समाजाच्या पलीकडे जाऊन, मेहनती, नेहमी उपलब्ध असलेल्या एका तरुण नेतृत्वाला जनतेने प्रचंड विश्वासाने विजयी केले.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक