मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. आज म्हणजेच शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी साडेदहा पर्यंत टपाली मतमोजणीच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने १२, शिवसेनेने १०, उबाठाने ९, मनसेने ६, काँग्रेसने ५, इतरांनी चार जागांवर आघाडी घेतली आहे. ही अगदी सुरुवातीचा आघाडी आहे.



मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान


मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ हजार ४३ मतदारांनी मतदान केले. मुंबईत २९ लाख २३ हजार ४३३ पुरुष आणि २५ लाख ५२ हजार ३५९ महिला तसेच २५१ इतर मतदारांनी मतदान केले.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.


काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.



मुंबई अशी सुरू आहे मतमोजणी



  1. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी अधिकारी आहेत.

  2. प्रत्येक अधिकारी साधारण दहा वॉर्डची जबाबदारी सांभाळणार

  3. एकावेळी केवळ दोन वॉर्डची मतमोजणी होणार, यामुळे पहिल्या टप्प्यात ४६ नंतर दुसऱ्या टप्प्यात ४६ या पद्धतीने मतमोजणीचे नियोजन आहे. जर कोणताही आक्षेप आला नाही तर पाच टप्प्यात मतमोजणी पूर्ण होईल. पण आक्षेप आल्यामुळे एखाद्या मतदारसंघाची मतमोजणी नव्याने करावी लागली अथवा विशिष्ट ईव्हीएमची मतमोजणी पुन्हा केली तर या प्रक्रियेत खर्ची होणार असलेल्या वेळेमुळे मतमोजणीस विलंब होणार आहे.

Comments
Add Comment

वांद्रे स्कायवॉकवर नजर हटी, दुघर्टना घटी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाशेजारी नव्याने आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे

एलबीएस मार्ग आणि शीव-कुर्ला रेल्वे मार्गावरील पूरपरिस्थितीला आता ब्रेक

मुंबई: भरतीच्या वेळी तसेच विहार आणि पवई तलावामधील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच

सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोट, चार जखमी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सांताक्रुझ पश्चिम येथून एक धक्कादायक बातमी आली आहे. सांताक्रुझ पश्चिमेच्या

भोगवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी साधला अंतराळवीरांशी संवाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा व भारताचे दुसरे अंतराळवीर

शिवजयंती उत्सव निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित