Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल धक्कादायक ठरताना दिसत आहे. मतमोजणीच्या ताज्या कलानुसार, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला मुंबईकरांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल केली असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे केवळ काही मोजक्याच जागांवर अडकली आहे. विशेष म्हणजे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही राज ठाकरे यांना मुंबईत आपली छाप पाडता आलेली नाही.



महायुतीची निर्णायक मुसंडी


भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली असून, 'मिशन मुंबई' फत्ते करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. २२७ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल ८८ जागांवर आघाडी घेत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही २८ जागांवर आघाडी मिळवत महायुतीची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने दिलेले कडवे आव्हान मोडीत काढत, मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 'डबल इंजिन' सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.



मनसेला मोठा फटका


मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. राज ठाकरे यांनी यंदा उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करत मुंबईत 'मराठी कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरुवातीच्या निकालानुसार मनसेला केवळ ५ जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते, यंदा युती करूनही ही संख्या वाढताना दिसत नाहीये. राज ठाकरे यांची सभा आणि संवाद यांचा प्रभाव मतपेटीतून उमटला नसल्याचे चित्र आहे.



प्रमुख शहरांमधील मनसेची पीछेहाट


राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात १६५ जागांपैकी १२२ जागांचे कल हाती आले असून तिथे मनसेला एकही जागा मिळालेली नाही. ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये मनसेला प्रत्येकी केवळ १ जागा मिळाली आहे. नाशिकमध्ये २ तर अहिल्यानगरमध्ये ३ उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी मनसेला केवळ ४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याशिवाय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूरसह एकूण २२ शहरांमध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे.



कोणत्या शहरात मनसेचा सफाया?


ज्या २२ शहरातील महानगपालिका निवडणुकीत मनसेला खातं उघडता आलेलं नाही, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला