राज्यभरात एमआयएमने जिंकल्या तब्बल ९५ जागा

मुंबई : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे २०५० मध्ये हिंदू ५४ टक्क्यांखाली आणि मुस्लीम लोकसंख्या ३० टक्क्यांवर जाईल", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडे केला होता. तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे राज्यभरात तब्बल ९५ नगरसेवक निवडून आल्याने या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.

मुंबईत ४ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मानखुर्द-गोवंडी या भागात एमआयएमने समाजवादी पक्षाला मोठा धक्का दिला. मुंबईतील मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागात औवेसी यांची जादू चालल्याचे दिसून येते. सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८ असे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. अमरावती महापालिकेत ६, ठाण्यात ५, नागपूरात ४ ठिकाणी एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत.
......
छत्रपती संभाजी नगरमध्ये संख्या सर्वाधिक

राज्यातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये एमआयएमचे ९५ नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत त्यांचे सर्वाधिक २४ नगरसेवक निवडून आले. तर, मालेगाव महापालिकेत २० नगरसेवक निवडून आले आहेत.
Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने