मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ हजार ४३ मतदारांनी मतदान केले. मुंबईत २९ लाख २३ हजार ४३३ पुरुष आणि २५ लाख ५२ हजार ३५९ महिला तसेच २५१ इतर मतदारांनी मतदान केले.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.


काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२७ प्रभागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारनंतर मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


वेळेनुसार मतदानाची टक्केवारी :


▪ सकाळी ९.३० वाजेपर्यंत – ६.९८%
▪ सकाळी ११.३० वाजेपर्यंत – १७.७३%
▪ दुपारी १.३० वाजेपर्यंत – २९.९६%
▪ दुपारी ३.३० वाजेपर्यंत – ४१.०८%
▪ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत – ५२.९४%

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा