मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले. संध्याकाळपर्यंत ५४ लाख ७६ हजार ४३ मतदारांनी मतदान केले. मुंबईत २९ लाख २३ हजार ४३३ पुरुष आणि २५ लाख ५२ हजार ३५९ महिला तसेच २५१ इतर मतदारांनी मतदान केले.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार नोंदणीकृत असून, यामध्ये ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ इतर मतदारांचा समावेश आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची गती मंद होती, मात्र दुपारनंतर मतदानात वाढ झाली.


काही भागांमध्ये मतदान केंद्र बदलण्यात आल्याने मतदारांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदार यादीत नावे नसणे, तसेच मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.


मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २२७ प्रभागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारनंतर मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


वेळेनुसार मतदानाची टक्केवारी :


▪ सकाळी ९.३० वाजेपर्यंत – ६.९८%
▪ सकाळी ११.३० वाजेपर्यंत – १७.७३%
▪ दुपारी १.३० वाजेपर्यंत – २९.९६%
▪ दुपारी ३.३० वाजेपर्यंत – ४१.०८%
▪ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत – ५२.९४%

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला